सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

नवरात्री कशाला

आला आला नवरात्री चा सण आला, "जयभिमवाला" पुन्हा घट बसवाया सज्ज झाला..#
नऊ दिवस आता त्या देवीला घरी आणणार. हजारोंनी पैैसा खर्च करून तिची उपासना करणार, प्रत्येक जण आता गहाण ठेऊन मस्तक होतील तिच्यापुढे नतमस्तक..#
मुलगा अडमिशन मिळावे म्हणून तिच्यासमोर टेकवील माथा आणि काॅलेजात जाऊन बोलेल कास्ट सर्टिफिकेट आहे माझ्याकडे अडमिशन द्या मला आताच्या आता..#
मुलगी म्हणेल हे देवी मी चांगल्या मार्काने पास होउ दे, अगं तुला शिक्षणाचा अधिकार मिळाला कुठून हे तरी आधी तुला कळू दे..#
वडील म्हणतील मी बाहेर गेलो तर घर माझे सुरक्षित ठेव, अरे संकटकाळी बाप लढला होता तेव्हा कुठे गेला होता रे तुझा देव..#
आई म्हणेल देवी तुझ्यामुळे माझ्या घराला सुखशांती मिळाली, अगं विचार कर जरा, जर बाबाच नसते आपल्या पाठीशी तर ख-या सुखाची व्याख्याच नसती कळाली..#
तेव्हा आता दगडधोंड्यांवर खर्च करुन पैसा आपण का रिकामा करतोय आपलाच खिसा. अरे आपल्या पदरात आहे कितीतरी महापुरुषांचा वारसा, त्यांचे तत्वज्ञान म्हणजेच आहे आपल्या प्रागतीक जीवनाचा आरसा, तेव्हा आता त्यांच्या विचारांचा घेउन वसा, हे मुर्खपणाचे वागणे सोडून जरा आता शहाण्यांच्या रांगेत बसा..#
अरे तु आज जे काही आहेस ते माझ्या भिमाच्या पुण्याईने, तुला सगळ देण दिलय माझ्या बापाने. आणि तु बापालाच गद्दारी करतोयस. बाहेर निघ या देव-देवतांच्या गौंधळामधुन, देवी-देवतांच्या नादी लागशील तर भिक मागत फिरशील. अरे बापाने दिलेल्या 22प्रतिज्ञा वाच. बौध्दांनो आता तरी जागे व्हा..#
#...जय भिम...नमो बुध्दाय...#

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा